Skip to main content

कोविड लसीकरणाच्या 'पुणे पॅटर्न'ची राज्यभरात चर्चा

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:






राज्यात सध्या 'कोव्हिशील्ड'बरोबर 'कोव्हॅक्सिन' लस देण्यात येत असून, त्यानुसार दोन्ही लशी एकाच केंद्रावर देताना त्याबाबतचे स्वतंत्र फलक लावण्यात येत आहेत. याशिवाय केंद्रावर आलेला लशींचा साठा त्याच दिवशी वापरण्यासह विविध दहा नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा 'पुणे पॅटर्न' चर्चेत आला आहे.

या लसीकरणाच्या पुणे पॅटर्नची चर्चा आता आरोग्य खात्यात होऊ लागली असून, त्याचे स्वागत होऊ लागले आहे. पुणे शहर, जिल्ह्यात सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. 'सर्व खासगी रुग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा उप रुग्णालयांमध्ये 'इविन' आणि 'कोविन'चे यूजर आयडी, पासवर्ड उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रत्येक कोरोना लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी 'इविन' आणि 'कोविन'चे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावेत. दोन्ही पोर्टलमध्ये माहिती भरण्याची, तसेच जिल्हास्तरावर रोज सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत माहिती कळविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात यावी. त्यासोबत कार्यक्षेत्रातील सर्व खासगी संस्थांची आकडेवारी घेऊन, ती जिल्हास्तरावर कळविण्याची जबाबदारी द्यावी, असे नियम केले आहेत,' अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आरोग्य समितीचे कार्याध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिली.

ज्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत, तेथे वेगवेगळ्या खोल्यांबाहेर 'कोव्हॅक्सिन' आणि 'कोव्हिशील्ड' लसीकरण असा उल्लेख असलेले फलक लावावेत. सर्व संस्थांना आता २४ तास लसीकरण करण्यास परवानगी देण्यात येत आहे. परंतु, आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सायंकाळी सहापर्यंत लसीकरण करण्यात येईल. लशींचा उपलब्ध असलेला साठा त्याच दिवशी संपविणे आवश्यक आहे. येथून पुढे लशीची मागणी करताना १० दिवसांऐवजी आता तीन दिवसांसाठी करण्याची सूचना करण्यता आली आहे. मागणी केल्यानुसार २४ तासानंतर दुसऱ्या दिवशी तालुक्यातून एक गाडी जिल्हा लससाठा केंद्राकडे पाठविणे आवश्यक आहे. या नियमांमुळे लसीकरण प्रक्रिया सुरळीत होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

'क्रॉस' लसीकरण टाळण्याच्या सूचना

लसीकरण केंद्रांवर 'कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' या दोन्ही लशी दिल्या जात आहेत. मात्र, नागरिकाला लशीचा दुसरा डोस देण्यापूर्वी, त्याने पहिला डोस कोणत्या लशीचा घेतला होता, याची खात्री लस देणाऱ्या कर्मचाऱ्याने करावी आणि 'क्रॉस' लसीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरण करताना लशींचे वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणावे, तसेच वाया गेलेली लस आणि वापरण्यात आलेली लस याची माहिती संकलित करून, ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.