Skip to main content

मंत्रालयात मारहाण झालेला शेतकरी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता अन्याय अत्याराचारवर बोलतात. पण, ते मुख्यमंत्री असताना २३ मार्च २०१७ रोजी मला मंत्रालयात गुरासारखी मारहाण केली. खोटं बोलले. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी आता शपथ घेतली आहे,`` भलं कर्जबाजारी होईल, पण मी जिवंत असेपर्यंत फडणवीसाला परत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. हा संदेश घेऊन मी महाराष्ट्रभर फिरेल,`` असं घाटशेंद्रा, ता. कन्नड. जि. औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारेंनी सांगितलं.

रामेश्वर हरिभाऊ भुसारे या अल्पभुधारक शेतकऱ्यांने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वताजवळेचे आणि मित्रांकडून 10 लाख रूपये खर्च केले. त्या रोपवाटीकेसाठी नियोजनही केले. रोपवाटिकेचे कार्डही छापले. त्यानंतर चांगले उत्पादन घेवून आपल्या पदरात चार पैसे पडतील या आशेवर असणाऱ्या भुसारे यांनी शेडनेटमध्ये पीक घेण्यास सुरवात केली. परंतु 11 एप्रिल 2015 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपीठीने त्यांचे शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले.आस्मानी संकटाने पुरते हादरलेल्या रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून कन्नड तहसीलदार व औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले. त्यानंतर कन्नड तहसीलदारांच्या आदेशाने त्यांच्यासह गावातील इतरांच्या नुकसानीचे पंचनामेही कृषीविभागाकडून करण्यात आले.

परंतु वर्ष उलटून गेले तरिही कोणतीही कार्यवाही होत नव्हती. मंत्र्यांना आपल्या समस्या कळावी म्हणून भूसारे हे गावापासून 35 किलोमीटर कन्नडला येवून मेल करायचे. सगळ्या मंत्र्यांनी त्यांनी मेल केले. जिल्हा अधिकारी, तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या सरकारी कार्यालयाच्या चकरा मारून थकलेल्या भुसारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली. 4 आॅक्टोबर 2016 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकी दिवसी आपल्याला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर चारवेळा मंत्रालयात चकरा मारल्यावर त्यांना जुन्या नियमाने तुला नुकसान भरपाई देता येणार नाही. तू नविन शेडनेट उभार त्यासाठी आम्ही बँकेला कर्ज द्यायला लावतो असे सांगण्यात आले.

त्यानंतर रितसर बँकेत अर्ज, जामीन हे सोपस्कर पार पाडले. त्यानंतर बँकेने भुसारे यांना 16 लाख 22 हजार 967 प्रकल्प खर्चापैकी 12लाख 17 हजार 225 इतके बँक लोन, तर 4 लाख 5 हजार 742 इतके म्हणजे 25 टक्के रक्कम भरण्यास सांगितले. पत्र्याच्या शेडमध्ये हा बळीराजा राहतोय. ते ही महिना पाचशे रूपये भाड्याने, त्याचे मुळे घर शेतात होते, तेही वादळीवाऱ्यात होत्याचे नव्हते झाले. चार एकर जमिन त्यात केवळ एकरभर भिजेल ऐवढचं पाणी, म्हणजे बागायती क्षेत्र केवळ एक एकर तो येवढे पैसे कुठून आणणार ? आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून पाठ पुरावा करतोय. पण आपली दखलच घेतली जात नाही. म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर भुसारे यांनी आझाद मैदानात उपोषणही केले. मात्र, शासन व्यवस्थेला जाग येत नसल्याने यावर कायतर मार्ग काढावा यासाठी रामेश्वर भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. मात्र, त्याला जरब मारहाण करून त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला.

 "बळी"राजा रामेश्वर भुसारे यांनी एक लहान मुलगी एक मुलगा आहे. पत्नी व रामेश्वर भुसारे रोजंदारीने कामाला जातात. चार एकर शेती तीही पडीक, केवळ एक एकर भिजेल इतकेच पाणी. त्यामुळे त्यांनी शेडनेट उभारले होते. पावसाने होत्याचे नव्हेत केले. आता ज्याला चुल पेटवायची भ्रांत. म्हणून शासनाकडे मदत मागणाऱ्या रामेश्वर भूसारे यांचे काय चुकले ? रामेश्वर भुसारे यांचा जगण्याचा हट्टाहास हाच त्यांचा गुन्हा होता काय ? गळ्याला फास घेवून जिवन संपवण्यापेक्षा संघर्ष करायचा आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे, "साथ द्या" ही मागणे करणे गुन्हा आहे काय ?तीन वर्षानंतरही रामेश्वर भुसारे न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...