Skip to main content

बेंढारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

डिंभा प्रतिनिधी:



आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतून होत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना व श्री. पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोखरी, ता. आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेंढारवाडी, पो. पोखरी, ता. आंबेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर ८ मार्च ते १४ मार्च २०२१ या कालावधीत पार पडले. 

 सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात आदिवासी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रबोधन व्हावे म्हणून आदिवासी पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी स्वच्छता अभियान, सुसंस्कृरीत युवक, पेसा व वनहक्क, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आदिवासी व्यक्तिमत्त्व विकास, युवकांपुढील आव्हाने या विषयांवर नामदेवराव कोळप, सीताराम जोशी (मा.उपकुलसचिव, पुणे विद्यापीठ), प्रा. चेतन वानखेडे, प्रा. कविता अभंग, अशोक पेकारी, राजू घोडे यांनी शिबिरार्थी आणि ग्रामस्थांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. शिबिरात बांध दुरुस्ती, मंदिर परिसर साफसफाई, पाईपलाईन वर सिमेंट ढापे बसविणे, रस्ते साफसफाई आदी कामे करण्यात आली. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील समाजाचे हक्क, कर्तव्य, रोजगार याबाबत ग्राम सर्वेक्षण करण्यात आले. 

 शिबिराचे संयोजन प्रा. लहू तिटकारे (राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी), प्रा. नम्रता पारधी, विशाल बेंढारी यांनी केले. डॉ. शशिकांत साळवे (प्राचार्य), बाळासाहेब कोळप (अध्यक्ष, श्री.पं.वि. वि.मंडळ, पोखरी), किसन दांगट (संचालक), नामदेव दांगट (व.दु. उ.संस्था, पोखरी), अशोक कोळप (ग्रा.स. पोखरी), दुंदाजी कोळप, मारुती कोळप, तुकाराम तळपे, प्रदीप कोळप, ज्ञानेश्वर कोळप, बुधाजी कोळप, पुंडलिक बेंढारी यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रम शिबिराची सांगता प्रा. भास्कर जगदाळे यांच्या "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या किर्तनपर जनजागृती व्याख्यानाने झाली. सदर दिवशी ग्रामस्थ व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.