Skip to main content

मुंबईत कोवीड हॉस्पिटलच्या आगीत 2 रुग्णांचा मृत्यू, 5 बेपत्ता

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:






 ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये सनराइज हॉस्पिटलमधील 2 निष्पाप रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु आता या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. या मॉलमध्ये नियमबाह्य पद्धतीने हे हॉस्पिटल सुरू असल्याची तक्रार याआधी इथल्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली होती. परंतु त्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाकडून केली गेली नाही. अखेर या मॉलमध्ये लागलेल्या आगीत निष्पापांचे बळी गेले, त्याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली आहे.

भंडारा येथील हॉस्पिटलच्या आगीची घटना ताजी असताना मुंबईतही एका हॉस्पिटलला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. भांडुपमधील ड्रीम्स मॉलला गुरूवारी रात्री आग लागली. ही आग याच मॉलमध्ये असलेल्या सनराइज हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 रुग्णांची सुटका करण्यात आली आहे पण इतर पाच रुग्णांचा शोध सध्या अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर ही आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिसर्याू मजल्यावर असलेल्या सनराइज हॉस्पिटलला देखील आगीने आपल्या विळख्यात घेतले. हे कोवीड हॉस्पिटल आहे. आगीची जाणीव होताच या हॉस्पिटलमधील रुग्णांनी प्रसंगावधान राखून इमारतीच्या छतावर आसरा घेतला. अखेर या सर्व रुग्णांना ग्लायडरच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. ड्रीम्स मॉलमध्ये अनेक गाळे हे बंद अवस्थेत आहेत तसेच अनेक कार्यालयं मात्र सुरु आहेत. पण आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणाही सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावे लागले आहे.

 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.