Skip to main content

शिरूर पोलिसांची अवैध दारू भट्टीवर कारवाई; १ लाख ३७ हजारांचा माल जप्त

 शिरूर प्रतिनिधी:  





रावडेवाडी (ता. शिरूर) येथे पोलिसांची दारू बनवणाऱ्या दारू भट्टिवर छापा टाकून गावठी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे बॅरल रसायन, दारू बनविण्याचे साहित्य असा १ लाख ३७ हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी माहिती दिली आहे.

 या कारवाई त वीस बॅरल दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तर दारू बनवणारे दोघेही फरार झाले आहेत. पोलीस अंमलदार करणसिंग निहालसिंग जारवाल  (शिरुर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.अर्जुन सदाशिव हीलाळ (रा कवठे यमाई मुंजळवाडी , ता.शिरूर), सुभाष पानगे (रा .निमगाव दुडे तालुका शिरूर जिल्हा पुणे)या दोघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून 25 फेब्रुवारी रोजी पावणेपाच वाजण्याचे सुमारास रावडेवाडी गावात ओढयाचे कडेला काटेरी झुडपामध्ये अर्जुन सदाशिव हिल्लाळसुभाष पानगे  हे हातभट्टी ची दारुची भट्टी व गावठी हातभटटी दारू तयार करीत असल्याची माहिती गोपनिय बातमीदार पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना मिळाल्यानंतर खानापुरे यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदव काबुगडे, पोलीस अंमलदार करण सिंग जारवाल, पोलीस पोलीस अंमलदार प्रवीण पिठले, पोलीस नाईक संजू जाधव या पथकाने रावडेवाडी येथील माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता दारूभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची चाहूल लागताच वरील दोघे आरोपी पळुन गेले.

 

त्यााठिकाणी वीस बॅरल दारू तयार करण्याचे रसायन, 200 लिटर मापाचे कच्चे रसायन प्रत्येकी 30 रु लिटर किंमत,एक गोलाकार जर्मनची थाळी ,एक जर्मनचा चाटु , असा एकूण एक लाख 37 हजारचा ऐवज मिळाला असून,  दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तर ही दारू भट्टी व दारू तयार करणारे दोन्ही जण पळून गेले आहे.याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(c)65(d)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलिस हवालदार राजेंद्र गवारे करीत आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...