Skip to main content

महिलेचे हरविलेले १० तोळे सोने शोधण्यात पोलिसांना यश, सोमनाथ वाफगावकरांची विशेष कामगिरी.


मंचर प्रतिनिधी

संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर पोलिसांच्या दैनंदिन काम चालू असताना मंचर पोलीस स्टेशन येथे एक दांपत्य अगदी केविलवाने चेहरे करून रडवेल्या चेहऱ्याने मंचर पोलीस स्टेशनचे दरवाजात उभे ठाकले. त्या वेळी सदर ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक तुकाराम मोरे, ठाणे अंमलदार अजित मडके हे त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे नाव संजय बजरंग मोहिते आणि त्यांची पत्नी सौ अर्चना संजय मोहिते दोघे राहणार कळंबोली मुंबई हे दिनांक 18/12/2020 रोजी त्यांचे नातेवाइकांचे लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे गेले होते त्यानंतर आज दिनांक 19/12/2020 रोजी ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल रविकिरण येथे कुटुंबियासह चहापान करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थांबले होते.  त्यानंतर चहापान करून सदर कुटुंब त्यांचे खाजगी वाहनातून मुंबई साठी रवाना झाले सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर अर्चना संजय मोहिते यांना आठवण झाली की त्यांची सुमारे दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेल रविकिरण एकलहरे येथील टेबलवरच राहिली आहे. त्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा हॉटेल रविकिरण येथे येऊन पाहणी केली असता तेथे त्यांची पर्स जागेवर मिळून आली नाही म्हणून त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली असता ते बसलेल्या ठिकाणचा कॅमेरा बंद असल्याने सदर कॅमेरामध्ये त्यांना कुठलीही माहिती मिळाली; नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी त्यांची माहिती घेऊन सदर बाबत तत्काळ पोलीस अमलदार सोमनाथ वाफगावकर याना दिली 

सोमनाथ वाफगावकर यांनी तात्काळ तत्परता दाखवत त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचे पर्स मधील मोबाईल चा नंबर हस्तगत  करून सायबर पोलिस स्टेशन येथून त्याचे लाईव्ह लोकेशन घेऊन सदर मोबाईल चाकण आळंदी फाटा ते आळंदी रोड च्या दरम्यान असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी लागलीच हॉटेल रविकिरण चे मालक युवराज शेठ कानडे यांना संपर्क केला त्यावेळी त्यांनी सांगितले की आज हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबीयांचे लग्न समारंभ होता त्यावेळी सोमनाथ वाफगावकर यांनी सदर लग्न प्रमुख श्री लक्ष्मण खोसे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना संपर्क साधून त्यांचे लोकेशन विचारले असता त्यांनी त्यांचे लोकेशन आळंदी परिसरात असलेबाबत सांगितले त्यामुळे पोलीस सोमनाथ वाफगावकर यांनी त्यांचे वऱ्हाडचे सर्व गाड्या तत्काळ तेथेच थांबणे बाबत त्यांना सूचना दिल्या आणि गाडीत सदर काळे रंगाचे पर्सची पाहणी करणे बाबत विनंती केली त्यामुळे श्री लक्ष्मण खोसे यांनी 

त्यांचे वऱ्हाडाची सर्व गाड्या रस्त्यात थांबून सर्व गाड्यांची पाहणी त्यावेळी त्यांचे लक्षात 
आले की हॉटेल मधील लग्न समारंभ संपले नंतर परत जाताना नजर चुकीने टेबल वर 
राहिलेली एक काळे रंगाची पर्स त्यांचे गाडीत आली आहे त्यानंतर त्यांनी सोमनाथ 
वाफगावकर याना संपर्क साधून त्यांची पर्स सुखरूप असलेबाबत कळविले. त्यानंतर सदर 
मोहिते दाम्पत्याने सदर श्री लक्ष्मणराव खोसे साहेब यांचे घरी जाऊन ती पर्स ताब्यात घेतली
असून त्यांचे सर्व 10 तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल फोन सुखरूप मिळाल्याने त्यांनी 
मंचर पोलीस स्टाफ आणि पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर तसेच श्री लक्ष्मण खोसे 
आणि महेंद्र खोसे यांचे विशेष आभार मानले त्यावेळी त्यांचे दागिने परत मिळलेले पाहून 
त्यांचे डोळ्यात आनंद अश्रू मावत नव्हते.

Attachments area

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.