Skip to main content

मंचर येथील अत्यावश्यक सेवेच्या वाहनातून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई.

नारायणगाव प्रतिनिधी



नारायणगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी बस स्टँड च्या समोर नाकाबंदी करीत असताना खोडद वरून बस स्टँड च्या दिशेने लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 'किराणा माल आंबेगाव तालुका' असा  बोर्ड  असणारी  टाटा सुमो गाडी क्रमांक एम. एच. १४ जी. ३७७१ येत होती. पोलिसांनी गाडीच्या ड्रायव्हरला  गाडी थांबविण्याचा इशारा केला  परंतु ड्रायव्हरने गाडी न थांबविता वेगात मंचर च्या दिशेने निघाला असता पोलिसांना  संशय आल्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या गाडीचा  सिने स्टाइलने पाठलाग सुरू केला  व  मांजरवाडी फाटा  येथे  गाडी  थांबविली. गाडीच्या ड्रायव्हर कडे वाहतूक पास  व  गाडीमध्ये  काय आहे  अशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची  उत्तरे देत असल्याचे लक्षात आले.



त्यामुळे  पोलिसांचा संशय  आणखी  बळावला. पोलिसांनी  गाडीची तपासणी केली असता  त्यामध्ये  विविध खोक्यांमध्ये  देशी-विदेशी  कंपनीच्या  दारूच्या बाटल्या दिसून आल्या. सदर गाडी नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये आणून पंचा समक्ष पंचनामा केला असता त्यामध्ये रुपये ३६,५३०/- च्या देशी-विदेशी दारूच्या  बाटल्या  व  रुपये १,००,०००/- किमतीचा  किराणामाल होता.  तो जप्त करून अवैधरित्या  वाहतूक करणाऱ्या  भरत कुंडलिक पिंगळे व  परेश पांडुरंग खुडे  (राहणार मंचर, तालुका आंबेगाव ) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
 
सदर कामगिरी  दिपाली खन्ना (उपविभागीय अधिकारी जुन्नर) यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल  शिंदे, लोंढे, साबळे, कोबल, लोहार, आरगडे, पोलीस मित्र भरत मुठे यांनी कारवाई केली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल साबळे करीत आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.