Skip to main content

आंबेगावातून परराज्यातील मजुरांची रवानगी.






कोरोना या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि या लॉकडाऊन मध्ये आंबेगाव तालुक्यात कामानिमित्ताने आलेले पर राज्यातील मजूर आणि इतर लोकांना आपल्या घरी पाठविण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी व शासकीय यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे.  











आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने किंवा अन्य काही कारणास्तव आलेले परप्रांतीय लोकांना एसटीने आपल्या घरी पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणा-या लोकांना एसटी महामंडळाच्या बसने मंचर व घोडेगाव येथुन रवाना केले. आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार अनंता गवारी, लतादेवी वाजे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, वैदयकिय अधिक्षक डॉ. प्रताप चिंचोलीकर, डॉ. चंदाराणी पाटील, मंडलाधिकारी योगेश पाडळे, सुनिल नंदकर, तलाठी दिपक हरण, संजय गायकवाड, दिपक करडुले, माने आदि अन्य कर्मचारी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या जवळपास ५५९ लोकांना एकत्र करून त्यांच्या गावी बसने पाठवून दिले.  

 

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन

एसटी बसच्या प्रत्येक सीटवर एक असे फक्त बावीस लोक यावेळी प्रवास करत आहे. छत्तीसगडला जाण्यासाठी ६ गाडयांमध्ये १३७  प्रवासी, मध्यप्रदेशला जाण्यासाठी १६ गाडयांमध्ये ४२२ लोकांना रवाना करण्यात आले. तर महाराष्ट्राच्या यवतमाळ, लातूर आदि विविध जिल्हयात जाण्यासाठी ३१२ प्रवाशांना ११ एसटीबसच्या सहायाने त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविण्यात आले. संबंधित लोकांना रवाना करताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग तसेच प्राथमिक तपासणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क वापरणे, सॅनिटायझर आदि बाबींचा अवलंब करण्यात आला.

 

सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार रमा जोशी, संपुर्ण तालुका महसुल प्रशासनाने विशेष नियोजन करून अडकुन पडलेल्या कामगार व मजुरांना महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात व परप्रांतियांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी चांगले नियोजन केले.






पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.