Skip to main content

अफवा पसरविणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी


देशात एकीकडे कोरणाने डोके वर काढायला सुरुवात केली असतानाच संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी गाईच्या तुपाचा आणि गोमूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल,’गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर 3 ते 4 तासाने तूप नाकात फिरवले, गोमूत्र दिले तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,’अशी अफवा पसरविणा-या संभाजी भिडे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हिड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडनिय कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.


कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्यासह देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराहून अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या उपायांचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.कोरोनामुळे मृत पावलेल्या बहुतांश व्यक्ती ६५-७० वयाच्या आहेत. तरुण क्वचितच कोरोनामुळे मृत पावत असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे तरुण मुलांना मैदानावर खेळायला सोडावे. सरकारनं लागू केलेल्या लॉक डाऊन (टाळेबंदी) मध्ये शिथिलता आणायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.


कोरोनावरील उपचारांत गोमूत्र आणि गायीचे तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा देखील त्यांनी केला. गोमूत्र, गायीचे तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना केंद्र आणि राज्य शासनाने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे त्यांनी सुचवले. कोरोनाबाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्याने नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचे मी आयुर्वेदात वाचले आहे. या जंतूंचा नाश करण्याचे सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचे बोट लावावे. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावे, असे उपाय त्यांनी सुचवले. केंद्र आणि राज्य सरकार भगवंताने दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास हे संशोधन आपण पुढल्या पिढ्यांना देऊ शकू. त्याचा त्यांना उपयोग होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे संभाजी भिडे म्हणाले.


देशात साथरोग अधिनियम लागु झाला आहे. महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून साथरोग अधिनियम १९८७ नुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी ” महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२०” हा कायदा १४ मार्च २०२० पासून राज्यात लागू केला आहे. सदर अधिनियमातील कलम ६ नुसार कोणत्याही व्यक्तीस, संस्था संघटनाना कोव्हीड १९ बाबत कोणत्याही प्रकारची अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक मिडीया किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा पुणे व संचालक वैधकीय शिक्षण व संशोधन मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या मार्फतच अधिकृत माहितीच्या प्रसारणाचे नियम घालून देण्यात आले आहे.


कोव्हीड १९ बद्दल कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणा-या व्यक्ती संस्था व संघटना यांच्या विरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेली विधाने ही निव्वळ अफवा असून त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही किंवा भिडे ही व्यक्ती अधिनियमातील माहिती प्रसारण करू शकणारी अधिकृत व्यक्ती देखील नाही. देश आणि राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम लागू झालेला असताना त्यांनी आज सांगलीत पत्रकारांसमक्ष कोरोना पिडीत व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होईल अश्या उपाययोजना सांगून अफवा पसरविली आहे.


त्याकरीता सांगली जिल्हा पोलीस अधिक्षकांनी भादंवि (४५ ऑफ) १८६० चे कलम १८८ नुसार संभाजी भिडे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व दंडात्मक कारवाई देखील करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.