Skip to main content

अफवा पसरविणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी


देशात एकीकडे कोरणाने डोके वर काढायला सुरुवात केली असतानाच संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी गाईच्या तुपाचा आणि गोमूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल,’गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर 3 ते 4 तासाने तूप नाकात फिरवले, गोमूत्र दिले तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,’अशी अफवा पसरविणा-या संभाजी भिडे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हिड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडनिय कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.


कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्यासह देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराहून अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या उपायांचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.कोरोनामुळे मृत पावलेल्या बहुतांश व्यक्ती ६५-७० वयाच्या आहेत. तरुण क्वचितच कोरोनामुळे मृत पावत असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे तरुण मुलांना मैदानावर खेळायला सोडावे. सरकारनं लागू केलेल्या लॉक डाऊन (टाळेबंदी) मध्ये शिथिलता आणायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.


कोरोनावरील उपचारांत गोमूत्र आणि गायीचे तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा देखील त्यांनी केला. गोमूत्र, गायीचे तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना केंद्र आणि राज्य शासनाने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे त्यांनी सुचवले. कोरोनाबाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्याने नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचे मी आयुर्वेदात वाचले आहे. या जंतूंचा नाश करण्याचे सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचे बोट लावावे. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावे, असे उपाय त्यांनी सुचवले. केंद्र आणि राज्य सरकार भगवंताने दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास हे संशोधन आपण पुढल्या पिढ्यांना देऊ शकू. त्याचा त्यांना उपयोग होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे संभाजी भिडे म्हणाले.


देशात साथरोग अधिनियम लागु झाला आहे. महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून साथरोग अधिनियम १९८७ नुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी ” महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२०” हा कायदा १४ मार्च २०२० पासून राज्यात लागू केला आहे. सदर अधिनियमातील कलम ६ नुसार कोणत्याही व्यक्तीस, संस्था संघटनाना कोव्हीड १९ बाबत कोणत्याही प्रकारची अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक मिडीया किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा पुणे व संचालक वैधकीय शिक्षण व संशोधन मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या मार्फतच अधिकृत माहितीच्या प्रसारणाचे नियम घालून देण्यात आले आहे.


कोव्हीड १९ बद्दल कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणा-या व्यक्ती संस्था व संघटना यांच्या विरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेली विधाने ही निव्वळ अफवा असून त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही किंवा भिडे ही व्यक्ती अधिनियमातील माहिती प्रसारण करू शकणारी अधिकृत व्यक्ती देखील नाही. देश आणि राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम लागू झालेला असताना त्यांनी आज सांगलीत पत्रकारांसमक्ष कोरोना पिडीत व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होईल अश्या उपाययोजना सांगून अफवा पसरविली आहे.


त्याकरीता सांगली जिल्हा पोलीस अधिक्षकांनी भादंवि (४५ ऑफ) १८६० चे कलम १८८ नुसार संभाजी भिडे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व दंडात्मक कारवाई देखील करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.