Skip to main content

कोरोना विरुद्धच्या लढाईत सरपंच मैदानात.

मंचर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार तसेच बँका, पतसंस्था यांचे  कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतले आहे . ग्रामपंचायतच्या वतीने सर्व व्यक्तीचे तापमान आठवड्यातुन दोन वेळा  घेण्याचे काम सरपंच दत्ता गांजाळे यांनी चालू केले आहे.



चाकण येथे अंडी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारी म्हणून मंचर येथे अत्यावश्यक सेवा देणारे मेडिकल, किराणा,भाजीपाला,शिवभोजन,होम डिलीव्हरी करणारे तसेच बॅंका,पतसंस्था यांचे बाहेर गावावरून येणारे कर्मचारी याचे तापमान घेण्यात येत आहे. आज स्वतः सरपंच दत्ता  गांजाळे यांनी अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानात जाऊन तसेच बँका, पतसंस्थामध्ये जाऊन तापमान तपासले . प्रत्येक व्यक्तीच्या  तापमानाची नोंद  ठेवण्यात आली आहे. दर आठवड्याला 2 वेळा तापमान घेऊन जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या तापमानात बद्दल आढळल्यास त्याचे मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घेण्यात येईल. असे सरपंच गांजाळे यांनी सांगितले.



मंचर येथे असणाऱ्या विविध बॅंका ,पतसंस्था या ठिकाणी असणारे कर्मचारी हे बाहेर गावावरून कामासाठी मंचर येथे येत असतात. खबरदारी म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांची तापमानाची तपासणी करून ग्रामपंचायत कर्मचारी अतुल लोंढे ,दिलीप थोरात, नरेंद्र निघोट या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या तापमानाच्या नोंदी ठेवून दर आठवड्याला यांची पुन्हा तपासणी होईल. कर्मचाऱ्यांच्या तापमानात फरक आढळल्यास त्यांची दवाखान्यात नेऊन तपासणी करणार आहे . या पूर्वी मंचर येथे सलग चार वेळा दर रविवारी संपूर्ण मंचर शहर पूर्णपणे बंद ठेवले जात होते. ते येथून पुढील काळातही दर रविवारी जनता कर्फ्यु राहणार आहे. मंचर मधील बहुतेक चौकात निर्जंतुकीकरण सेवा उपलब्ध करून दिली आहे. किराणा, भाजीपाला घरपोच सेवा देणे ग्रामपंचायतच्या वतीने चालू आहे. आता आरोग्य तपासणी मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतली असून कोरोनाचा एकही रुग्ण शहरात  येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.