Skip to main content

त्या निष्ठुर हवालदाराला निलंबित करा - सचिन बांगर

अवसरी येथील रहिवाशी असणाऱ्या ससाणे भावंडांना अमानुष मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित करण्यात यावे अशी मागणी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे विस्तारक सचिन बांगर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.



दिनांक ३ एप्रिल रोजी शेतावर काम करत असणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ओंकार ससाणे आणि रोहन ससाणे या भावंडांना गावडेवाडीच्या हद्दीत मंचर पोलीस ठाण्याचे अवसरी बीट चे हवालदार सुनील शिंदे यांनी अमानुष मारहाण केली होती. यात ओंकार ससानेच्या डोक्यात काठी लागून त्याची शुद्ध देखील हरपली होती.


या मारहाणीचा व्हिडीओ राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती, त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ संबंधित हवालदाराची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पुणे येथील मुख्यालयात बदली केली होती. 


ससाणे भावंडाना झालेल्या या मारहाणीचा प्रकार अतिशय निंदनीय असून यात ओंकार च्या डोक्यावर झालेला आघात अजून थोडा जरी तीव्र असता तर त्याच्या जीवाला काही बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण झाली असती, त्यामुळे अशा बेजाबदर आणि निष्ठुर अधिकाऱ्याची बदली करून चालणार नाहीत तर त्याचे निलंबन करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी सचिन बांगर यांनी केली असून त्यांच्या मागणीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळत आहे.


या संदर्भात सचिन बांगर यांनी शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे मार्गदर्शन घेऊन सदर मागणी केली असून ते सातत्याने संबंधितांकडून आढावा घेत आहेत.


 ससाणे भावंडांना अशी झाली होती मारहाण, व्हिडिओच्या शेवटी ओंकार चक्कर येऊन पडताना दिसत आहे. यात बराच वेळ ओंकार ची शुद्ध देखील हरपली होती.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.