Skip to main content

त्या नऊ मिनिटांत नक्की काय झाले..?

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाईट बंद करुन दिवे लावण्याच्या आवाहनला रविवारी रात्री मोठा प्रतिसाद मिळाला. पण ९ मिनिटे लाईट बंद करुन ठेवण्यामुळे राज्यात वीज ग्रीडवर परिणाम होऊन वीजेचा पुरवठा खंडीत होण्याची भीती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. परंतू वीज ग्रीडवर या लाईट बंद करण्याच्या प्रक्रियेचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.



त्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्या, ऊर्जा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच जनतेनेही घरातील मेन स्वीच बंद न करता केवळ विजेचे दिवे बंद करुन मेणबत्त्या व इतर दिवे लावल्याने ऊर्जामंत्र्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. दिवे बंद करण्याच्या उपक्रमाच्या काही मिनिटे आधापीसून ऊर्जामंत्री नागपूरच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यभरातील वीज अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ९ मिनिटांच्या कालावधीत राज्यभरात विनाव्यत्यय वीज पुरवठा सुरू होता. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.


त्या ९ मिनिटांत कसा झाला विजेचा वापर? वेळ विजेची मागणी (मेगावॅट)


रात्री ८. ३९ १३ हजार ३७७
रात्री ८. ४२ १३ हजार १२१
रात्री ८.५४ १२ हजार ८५७
रात्री ८.५७ १२ हजार ४५५
रात्री ९.०० ११ हजार ३१५
रात्री ९.०३ १० हजार ३६५
रात्री ९.०५ १० हजार १२१
रात्री ९.०७ ९ हजार ९७३
रात्री ९.०९ ९ हजार ८८०
रात्री ९.१२ १० हजार ७४१


या ९ मिनिटांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार २४१ मेगावॅटची घसरण झाली. या दरम्यान फ्रिक्वेन्सी कमाल ५०. २३ ते किमान ५०.०९ नोंदवण्यात आली. या दरम्यानच्या काळात कोयना जलविद्युत केंद्र, उरण वायू विद्युत केंद्र तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी आणि पारस विद्युत केंद्रातून वीज उत्पादन सुरू होते. ९ मिनिटांच्या कालावधीत लोकांनी स्वेच्छेने लाईट बंद केले पण मेन स्विच बंद न करत ऊर्जा विभागाला सहकार्य केले म्हणून ऊर्जामंत्री राऊत यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.