Skip to main content

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मच्छीमारांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.

 


इंदापूर(प्रतिनिधी):- संचारबंदी व लॉक डाऊनलोड असल्याने उजनी जलाशय परिसरातील मच्छिमारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.या मच्छीमारांचा सर्वे करून,इंदापूर तालुका महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाने जीवनोपयोगी वस्तूंचे व धान्याचे वाटप केल्याने,खऱ्या अर्थाने मच्छीमारांना आधार मिळाला असे गौरवोद्गार भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी काढले.



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब,गरजू व मच्छीमार कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किट वाटप पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत (नाना)बंडगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने साहेब,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे सोमवार(ता.२७ एप्रिल)रोजी संपन्न झाला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने मच्छीमारांना मार्गदर्शन करीत होते.


यावेळी महाराष्ट्रातील मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे उपाध्यक्ष जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले,रामदास पवार,निखिल कणसे,शिवाजी पवार,शिवकुमार गुणवरे, दत्तात्रय गवळी,कुंभारगावच्या सरपंच जयश्री धुमाळ,दत्ता नगरे,नानासाहेब मारकड,नितीन चितळकर,दादासाहेब थोरात,काशिनाथ सोलनकर,सिताराम नगरे, प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे,राजेंद्र भोसले यांच्यासह पत्रकार संघाच्या पदाधिकारी उपस्थित होते. 


पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने म्हणाले की,फिरस्ती व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्याने इंदापूर तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात खरेदी-विक्री मालाची करण्यासाठी जाण्याची गरज नाही.करोणा हा दुर्धर आजार संसर्गाने होत आहे. त्यामुळे उगीच फिरण्याची रिस्क कोणत्याही व्यापाऱ्याने घेऊ नये,इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना हक्काचा घास मिळतो आहे. त्यामुळे पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. संचारबंदी असल्यामुळे गावाच्या हद्दीतून किंवा रस्त्यावरती विनाकारण फिरण्याचे धाडस दाखवू नका. आपल्या आरोग्याला सांभाळा,काळजी घ्या असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर तसेच पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले व ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे यांनी करोना यासंदर्भात खबरदारी यासंबंधी मार्गदर्शन केले.



कुंभारगाव(तालुका इंदापूर)येथील मच्छीमारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवनोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व मान्यवर.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.