Skip to main content

अमेरिकेला भारताकडून हवे आहे हे औषध, ट्रम्प यांनी मोदींकडे केली मागणी.


जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बलाढ्य अमेरिकेने आता या आजाराशी लढण्यासाठी भारतापुढे मदतीसाठी हात पसरला आहे. COVID-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतानं अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळ्यांचा पुरवठा करावा अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले.


“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळ्यांची स्थगित केलेली अमेरिकेची ऑर्डर लवकरच पूर्ण करण्याचा भारत गांभिर्याने विचार करत आहे” अशी माहिती डोनाल्ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर दिली. डॉक्टरांशी सल्ला मसलत करुन आपणही हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळी घेऊ असंही ट्रम्प म्हणाले आहेत. हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन ही गोळी मलेरियाच्या उपचारासाठी दिली जाते.


परंतू भारतात कोरोनाच्या रुग्णांसाठी ही गोळी फायद्याची ठरत असल्याने आता अमेरिकेने या गोळ्या मागवल्या आहेत. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने भारतानं मलेरिया रोधक औषधांची निर्याती थांबवली असल्याने अमेरिकेने या गोळ्यांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.


फोनवरील चर्चेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिका कोरोनाविरोधातल्या लढाईत एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील असं म्हणत अमेरिकेची मदत करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा दररोज वाढतोय. गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाबाधीत २३ हजार ९४९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात १ हजार २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधीतांची संख्या ३ लाखांच्यावर गेली असून मृतांचा आकडा ८ हजार १७५ झाला आहे. हे सर्व पाहून प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.