Skip to main content

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीचे घरीच आयोजन

ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान,कळंब(ता.आंबेगाव) च्या वतीने कोरोना आपत्तीमुळे महात्मा फुले व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साधेपणाने साजरी करण्यात आली.




कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा फुले-आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सार्वजनिक मिरवणुका, शोभायात्रा काढू नयेत, वाद्ये वाजवू नयेत, त्याऐवजी घरामध्येच या थोर महात्म्यांच्या  प्रतिमेला अभिवादन करावे, असे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले होते.त्याचे पालन करत ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनीषा कानडे ,समीक्षा कानडे ,सम्राट कानडे ,शांता कानडे यांनी प्रतिमापूजन केले .एक दिवा ज्ञानाचा ...तर एक दिवा संविधानाचा लावत या महापुरुषांचे जीवनाधारीत गाण्यांचे श्रवण केले.निवडक पुस्तकांचे वाचन केले.कु.सान्वी कानडे ,लावण्या कानडे ,ईश्वरी कानडे यांनी ..आला भीमराया,जग उद्धाराया ..हे गीत गाऊन जयजयकार करत महामानवाला अभिवादन केले. 




यावेळी  बाळासाहेब कानडे म्हणाले, "थोर समाज सुधारक महात्मा फुले  व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला.समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली.समाज प्रबोधनात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.मानव तितुका एकच आहे .त्यांची समतेची,शिक्षणाची ,सामाजिक सलोख्याची शिकवण डोळ्यासमोर ठेवूनच आपण आचरण करूया ." फुले-आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोरोनाविषयक खबरदारी घेत परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना खाऊवाटप करण्यात आले ,चार गरजू कुटुंबाना आठ्वड्याभरासाठी किराणा देण्यात आला असून पंतप्रधान/मुख्यमंत्री मदतनिधीसाठीही खारीचा वाटा देणार असल्याचे बाळासाहेब कानडे यांनी सांगितले.



कळंब (ता.आंबेगाव) येथे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या वतीने  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करन्यात आले


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.