Skip to main content

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीचे घरीच आयोजन

ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान,कळंब(ता.आंबेगाव) च्या वतीने कोरोना आपत्तीमुळे महात्मा फुले व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साधेपणाने साजरी करण्यात आली.




कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा फुले-आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सार्वजनिक मिरवणुका, शोभायात्रा काढू नयेत, वाद्ये वाजवू नयेत, त्याऐवजी घरामध्येच या थोर महात्म्यांच्या  प्रतिमेला अभिवादन करावे, असे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले होते.त्याचे पालन करत ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनीषा कानडे ,समीक्षा कानडे ,सम्राट कानडे ,शांता कानडे यांनी प्रतिमापूजन केले .एक दिवा ज्ञानाचा ...तर एक दिवा संविधानाचा लावत या महापुरुषांचे जीवनाधारीत गाण्यांचे श्रवण केले.निवडक पुस्तकांचे वाचन केले.कु.सान्वी कानडे ,लावण्या कानडे ,ईश्वरी कानडे यांनी ..आला भीमराया,जग उद्धाराया ..हे गीत गाऊन जयजयकार करत महामानवाला अभिवादन केले. 




यावेळी  बाळासाहेब कानडे म्हणाले, "थोर समाज सुधारक महात्मा फुले  व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला.समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली.समाज प्रबोधनात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.मानव तितुका एकच आहे .त्यांची समतेची,शिक्षणाची ,सामाजिक सलोख्याची शिकवण डोळ्यासमोर ठेवूनच आपण आचरण करूया ." फुले-आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोरोनाविषयक खबरदारी घेत परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना खाऊवाटप करण्यात आले ,चार गरजू कुटुंबाना आठ्वड्याभरासाठी किराणा देण्यात आला असून पंतप्रधान/मुख्यमंत्री मदतनिधीसाठीही खारीचा वाटा देणार असल्याचे बाळासाहेब कानडे यांनी सांगितले.



कळंब (ता.आंबेगाव) येथे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या वतीने  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करन्यात आले


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.