Skip to main content

मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांची बदली. अखेर ससाणे भावंडांना मिळाला न्याय.


दिनांक ३ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील वायाळ मळा येथील शेतावर काम करणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या दोन भावंडांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदार सुनील शिंदे यांची पुणे येथे पुणे ग्रामीण पोलीस च्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. सर्वप्रथम समर्थ भारत न्यूज ने घटनेची दखल घेत या पोलीस हवालदाराचे कारनामे जनतेसमोर आणले होते. या  बातमीची दखल घेत; अधीक्षक संदीप पाटील याांनी ही कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने निष्पाप, निरागस भावंडे, त्यांचे कुटुंबीय आणि जनतेने समाधान व्यक्त केले आहे. 


कोरोना ला आळा घालण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून यादरम्यान पोटापाण्यासाठी घराबाहेर निघणाऱ्या जनतेशी सबुरीने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देऊनही काही पोलीस अधिकारी या सुचनेकडे दुर्लक्ष करत गरीब जनतेवर रुबाब करत आहेत. पोलीस हवालदार शिंदे यांनी देखील शेतावर राबणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवण घेऊन जाणाऱ्या गरीब, दुर्बल आणि निरागस भावंडांना अमानुषपणे मारहाण केली होती. या दोघांपैकी रोहन ससाणे हा तर अल्पवयीन होता, हे माहिती असूनही शिंदेंनी त्यालाही सोडले नव्हते.


वायाळ मळ्याकडे जात असताना गावडेवाडी येथे दोघा भावंडांना झालेल्या या मारहाणीत पोलीस हवालदार शिंदे यांची मुजोरी आम्ही सर्वप्रथम जनतेसमोर आणली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पनाही दिली. मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी दिलेले आश्वासन पाळले देखील. यानिमित्ताने पोलीस प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांच्या चुकीला पाठीशी घालत नाही; हे दाखवून दिले.


निष्ठुर पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी अशी केली होती मारहाण.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.