Skip to main content

साने गुरुजी कथामालेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अकरा हजारांची मदत.

देशात व राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.मात्र या उपाययोजना राबवताना आर्थिक मदतीची गरज असल्याने त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने कोरोना निवारण व प्रतिबंधात्मक उपाय  योजनांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
    साने गुरुजी कथामालेद्वारा मुख्यमंत्री सहाय्यता मदतनिधीसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयेचा धनादेश  प्रांताधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,सचिव चांगदेव पडवळ,कार्यकारी सदस्य संतोष थोरात यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
     भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने कथामाला कार्यकारिणीची राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारप्राप्त शाळा शिवनगर(ता.शिरूर) येथे होणारी नियोजित मासिक सभा कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रद्द करून वॉट्स-अप चर्चा घेण्यात आली .प्रमूख कार्यवाह शामराव कराळे,मार्गदर्शक संजय डुंबरे,राज्यप्रतिनिधी संजय शिर्के ,उपाध्यक्ष बाळासाहेब घोडे,कोषाध्यक्ष  संतोष गडगे ,कार्याध्यक्ष राजेश कांबळे, मंगेश मेहेर,रवींद्र वाजगे ,सुनील पाटील ,बबनराव सानप,वैशाली गाढवे,मनीषा कानडे यांनी चर्चेत सहभाग घेऊन सर्वप्रथम राष्ट्रीय कार्य म्हणून आपण सारे यात सहभागी होऊन आपापल्या भागात खबरदारीने वागणे ,केंद्र व राज्य सरकारचे सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे ,योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनबाबत प्रबोधन करणे,शालेय विद्यार्थीमित्रांना वाचन व अभ्यासास प्रवृत्त करणे ,आपले कार्यक्षेत्रात कोणीही उपाशी राहणार नाही याबाबत दक्षता घेणे व जबाबदार नागरिक म्हणून अफवांवर विश्वास न ठेवणे ,चुकीच्या पोस्ट टाकू नये,मुख्यमंत्रीनिधीस मदत तर करूयाच पण आपापल्या परीने आपल्याच कार्यक्षेत्रात मदत करणेबाबत चर्चा केली .
     महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे,हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे.पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.सध्य स्थितीत कोरोनाआपत्ती निवारणासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निधी दिल्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे यांनी सांगितले.



अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपविभागीय प्रांताधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे धनादेश देताना कथामाला कार्यकर्ते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.