Skip to main content

महिलेशी फेसबुक वरील मैत्री आली अंगलट. सहकाऱ्यांच्या मदतीने एकास लुटण्याचा प्रयत्न

फेसबुक वर ओळख करून वारंवार गप्पा मारून व्यवसायानिमित्त बोलायचे आहे आपण बाहेर भेटू असे म्हणत नाशिक येथील व्यक्तीला भेटायला बोलावून त्याला साथीदारांच्या मदतीने जबर मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब येथे घडला आहे याबाबत त्या व्यक्तीने आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.




याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर मोहनराव सातपुते (वय ४३ व पंचवटी, नाशीक) या व्यक्तीची २० दिवसांपूर्वी पुजा पाटील नावाच्या महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती त्यांच्यात वारंवार गप्पा होत होत्या फिर्यादी नोकरी करत मोकळ्या वेळेत मार्केटिंगचे काम करत होता.दिनांक २८/२/२०२० रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास महिलेने फेसबुकवर मेसेज करुन आपण उदया व्यवसायाच्या कामासाठी भेटुया तुम्ही नाशीकपासुन अर्ध्या अंतरावर या मी पुणे पासुन अर्ध्या अंतरावर येते त्यानंतर दिनांक २९/२/२०२० रोजी सकाळी महिलेने फेसबुकवर मेसेज करुन आपऩ सकाळी ११ वा चे दरम्य़ान भेटु असे सांगितले त्यानंतर दुपारी फोन करुन सांगितले की मी पुणे वरुन निघाले आहे .त्यानंतर फिर्यादीने ५:३० वा चे दरम्यान तिला फोन करुन विचारले की कुठपर्यंत आलात असे विचारले असता महिलेने मी रस्त्यात आहे असे सांगितले त्यानंतर परत फिर्यादीने त्यांना सायंकाळी मेसेज करुन सांगितले की तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही जेथे असाल तेथुन परत जा त्यानंतर महिलेने फोन करुन मी नाराय़णगाव जवऴ रोडच्या कडेला गाडी उभी करुन थांबले आहे तुम्ही या असे सांगितले असता फिर्यादी रात्री ९ वा चे दरम्यान नारायणगावच्या पुढे २ किमी अंतर गेल्यावर त्याला एक स्वीफ्ट गाडी उभी असलेली दिसली.


त्याठिकाणी तो गाडीतून खाली उतरला असता स्वीफ्ट गाडीमधुन तीन इसम खाली उतरले व त्याला फिर्यादीच्या गाडीत अल्टो ८०० नंबर एम.एच.१५ इ.एक्स.१०३६ गाडीमध्ये बसविले व तु आमचे बहीणीबरोबर फेसबुकवर ओळख करुन तिला त्रास देतो असे म्हणुन मारहाण करत व खिशातील ४ हजार रुपये , सँमसंग व एम.आय.कंपनीचे दोन मोबाईल तसेच डेबीट व क्रेडीट कार्ड,आधारकार्ड इ काढुन घेतले त्यानंतर गाडी पुण्याच्या दिशेने नेऊन भोसरीच्या जवळ एका निर्जन ठिकाणी उभी करुन फिर्यादिस मारहाण करत आम्हाला पंधरा लाख रुपये दे नाहीतर आमचे बहीणीला त्रास देतो अशी तुझ्याविरुद्ध पोलीसात खोटी तक्रार देवु असे म्हणाले पूर्ण रात्रभर फिर्यादिस गाडीत फिरवुन वेऴोवेऴी हाताने ,राँडने मारहाण करुन चटके देवुन पैशाची मागणी केली दुसऱ्या दिवशी सकाळी ते फिर्यादीस मारहाण करत असताना तो त्यांना झटका देवुन पळुन गेला व जवळील बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीसांना घेववुन त्या ठिकाणी गेला असता तेे तीन इसम गाडी घेवुन तेथुन पळुन गेले होते.नंतर फिर्यादीने आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून घडलेला गुन्हा मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो मंचर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करत आहेत.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.