Skip to main content

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलने भोवले, कोठारी व्हील्स वर गुन्हा दाखल

         
संपूर्ण जगभर कोरोना विषाणू  ने धुमाकूळ घातला असून प्रशासन आपापल्या पातळीवर अनेक उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येत आहे.पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून,त्याची अंमलबजावणी जिल्ह्यासह  नारायणगाव शहरात देखील  केली आहे.



       
नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने निमगावसावा, वडगाव कांदळी, धनगरवाडी, वारूळवाडी व नारायणगाव या 5 बीट मध्ये पोलिसांच्या पाच टीम डोळ्यात तेल घालून पेट्रोलिंग करीत आहेत.नारायणगाव शहरातील सर्व दुकाने, आस्थापना  शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई  होणार आहे. त्यामध्ये हाॅस्पीटल्स, जीवनावश्यक वस्तू-  छोटी किराणा दुकाने, मेडिकल, दूध, छोटे भाजीपाला विक्रेते यांना वगळण्यात आले आहे.          


 शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज घरी पठण करण्याचे  मान्य केले आहे. प्रशासना द्वारे   धार्मिक स्थळांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. लग्न कार्यालय, हॉटेल व्यवसाय, बिअर बार  पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


 नारायणगाव मध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे शहरातील कोठारी व्हील्स वर कारवाई करण्यात आली आहे. कोठारी व्हील्स आस्थापना  शासनाचा आदेश असूनही सकाळी 10.30 वाजता चालू ठेवून,त्यामध्ये लोकांची गर्दी जमवून आणि दुकानातील कामगार एकत्र जमवून दुकानातील गाड्यांची विक्री व दुरुस्ती करीत असल्याचे आढळून आले.त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा आदेश क्रमांक पुणे क.जि.आ.व्य. / का. वि. /138 / 2020 अन्वये अवमान केल्याप्रकरणी नरेंद्र शरदचंद्र करंदीकर ( असि. जनरल मॅनेजर, कोठारी व्हील्स ) प्रवीण दिवेकर ( व्हाईस चेअरमन,कोठारी व्हील्स ) यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 188 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असे नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले. 


नारायणगाव शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती लोकनियुक्त विद्यमान सरपंच बाबुभाऊ पाटे, सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील. वैद्यकीय अधिकारी व पोलीस पाटील यांनी केले आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.