Skip to main content

जेष्ठ पत्रकार भरत अवचट यांना ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा


राज्य पत्रकार संघ जुन्नर व आंबेगावच्या वतीने सकाळचे जेष्ठ पत्रकार, राज्यशासनाच्या वतीने सन २०१७ ला  पहिला शिवनेरी भूषण प्रतिभावंत पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आदरणीय भरत त्र्यंबक अवचट (काका) यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचा मान-सन्मान जुन्नर तालुका अध्यक्ष रविंद्र भोर व आंबेगाव तालुका प्रतिनिधी अविनाश घोलप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राजू डोके,  शिवाजी अस्वार, मनोहर हिंगणे व प्रतिनिधी उपस्थित होते.


   अवचट यांना राज्यशासनाच्या वतीने सन २०१७ चा पहिला शिवनेरी भूषण प्रतिभावंत पत्रकार पुरस्कार देण्यात आला. सन २०११ मध्ये पिंपळवंडी येथे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात शिवांजली भूमीपुत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन १९९२ मध्ये पुणे येथे बृहन महाराष्ट्र कॉलेज आँफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघटनेने पत्रकार वरुणराजे भिडे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ओतूर ग्रामस्थ व मित्र परिवाराने नागरी सत्कार करुन मानपत्र, पुणेरी पगडी व ५१ हजार रुपयांची थैली देऊन सन्मानित केले. 
   सन १९९७ पासून जुन्नर तालुक्याचे १० वर्षे सकाळ चे बातमीदार म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ओतूर चे काम ते पहात होते. त्यांनी आदिवासी भागातील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडविले तसेच पिंपळगाव जोगा धरणग्रस्तांसाठी ते लढले, अनेक विधायक उपक्रम त्यांनी राबविले. २५ पेक्षा जास्त रास्ता रोको, २५ वर्षे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन, स्त्रियांसाठी तनिष्का व्यासपीठाची निर्मिती, अनाथ, आदिवासी मुलांसाठी आनंदयात्रेचे सलग ३० वर्षे आयोजन आणि अशा प्रकारचे अनेक विधेयक उपक्रम त्यांनी राबविले. शरीराचा डावा भाग पूर्णपणे लूळा पडलेला असताना देखील धडधाकट असल्याप्रमाणे धडाडीने त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. दुर्लक्षित परिसराच्या व समाजाच्या विकासाकरिता बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले हे योगदान  उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी अविनाश घोलप यांनी व्यक्त केले.



   याप्रसंगी अवचट यांचा मित्र परिवार जयप्रकाश डुंबरे, सुनिल वैद्य, डॉ. भरत घोलप, शितोळे सर, शरद शेटे, ॲड. पानसरे, विजू कर्डिले आदि मान्यवर उपस्थित होते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.