Skip to main content

पिरसाहेब यात्रेवर कोरोनाचे सावट. यात्रा रद्द झाल्याचे यात्रा कमिटीने केले जाहीर.

आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्हा,नगर ,येथील हिंदू-मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे व श्रद्धेचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील श्री पीरसाहेब देवाची यात्रा (ऊरुस) मंगळवार दि. १७ ते गुरुवार दि. १९ असा तीन दिवस भरणार होती. पण यात्रेसाठी बाहेरून आलेल्या भाविकांमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन त्याचा फैलाव होऊ नये म्हणून वडगावपीर व मांदळेवाडी ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरस चे रुग्ण देशात अनेक ठिकाणी आढळून आले असून पुण्यातही कोरोनाचे ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अतिदक्षता म्हणून अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून त्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासाठी आंबेगाव तालुक्यात वडगाव पीर येथे होणारा पिराचा उरूस (यात्रा) रद्द करण्यात आली आहे. आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गावच्या ग्रामस्थांची बैठक वडगावपीर येथे शुक्रवार दिः.१३ रोजी आयोजित केली होती. यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, वडगावपीरच्या सरपंच मिरा पोखरकर, मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक,हजरत दावल मलिक पीरदर्गा शरीफ ट्रस्टचे अध्यक्ष हनिफभाई मुजावर, उपसरपंच रविंद्र गुळवे, जायदाबी मुजावर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सावळेराम आदक, शांताराम सुर्यवंशी, पोपट राजगुडे, सचिन आदक, संतोष आदक, लिलाधर आदक, बापू आदक,ग्रामसेविका मनिषा काळे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी व बाहेरील भाविक भक्तांनी यात्रा रद्द झाल्यामूळे यात्रेसाठी येऊ नये असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.