Skip to main content

समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू - राज्यमंत्री भरणे

अक्षय इंदोरे



इंदापूर जिल्हा पुणे येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री (राज्यमंत्री) ना. दत्तात्रय भरणे (मामा), महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि प्रदेश प्रसिद्धी प्रमुख  नवनाथ जाधव  यांच्या प्रमुख उपस्थितीत, इंदापूर पंचायत समितीच्या; लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांना मोफत हेल्मेट, डायरी, ओळखपत्र इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.


यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा संघ असून, या संघमुळे पत्रकारांचे मनोबल उंचावले आहे. या संघाच्या वतीने पत्रकारांची विशेष काळजी घेतली जाते, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील पत्रकारांना हेल्मेट चे वाटप करण्यात येत आहे. 



या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, सरचिटणीस सागर शिंदे, आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. समीर राजे, इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महारुद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल भिसे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील तसेच पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर नाना गलांडे, कार्याध्यक्ष जावेद मुलानी, तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तब्बल सत्तर सदस्य व प्रेस फोटोग्राफर उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करत असताना पत्रकाराने कुठल्याही नेत्याची भाटगीरी करता कामा नये. पत्रकाराने निष्पक्ष आणि निर्भीडपणे आपली भूमिका मांडत राहणे गरजेचे आहे. पत्रकारांमध्ये सरकार बनविण्याची आणि पाडण्याची टाकत असते. आपण समाजाला जबाबदार राहून कार्य करणे गरजेचे आहे असेही यावेळी ते म्हणाले



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करत असताना पत्रकाराने कुठल्याही नेत्याची भाटगीरी करता कामा नये. पत्रकाराने निष्पक्ष आणि निर्भीडपणे आपली भूमिका मांडत राहणे गरजेचे आहे. पत्रकारांमध्ये सरकार बनविण्याची आणि पाडण्याची ताकत असते. आपण समाजाला जबाबदार राहून कार्य करणे गरजेचे आहे असेही यावेळी ते म्हणाले.


या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.