Skip to main content

बेंढारवाडी मध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न

डिंभे- प्रतिनिधी

 
आंबेगाव तालुक्यात आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेने मातृ-पितृ पूजन कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुले व माता-पिता सहभागी झाले होते.


समाजामध्ये चॉकलेट डे ,टेडी डे , प्रॉमिस डे व वेलेन्टाइन डे साजरे करण्यापेक्षा मातृ-पितृ पूजन डे साजरे करणे काळाची गरज आहे. संपूर्ण विश्वामध्ये आई वडिलांचे स्थान सर्वात उंचीवर आहे. खरे प्रेम आई वडीलच देऊ शकतात. सेवेमध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा करणे हेच जीवनाचे खरे सार्थक.त्यांच्या सेवेमध्ये सर्व तीर्थ दडलेली आहेत.त्यांच्या चरणस्पर्शामुळे जीवनात काहीच कमी पडत नाही.मुलांच्या चुकीच्या वागण्याने आई वडिलांना असहय्य वेदना सहन कराव्या लागतात. हेच संस्काराचे बीज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंढारवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब इंदोरे व सहशिक्षक नामदेव बांबळे यांनी सर्व मुलांच्या आई वडिलांना शाळेत बोलावून मातृ-पितृ पूजन कार्यक्रम साजरा केला. आई वाडीलांप्रति असणारे प्रेम कृतीतून व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळाली. मुले व पालकांना अक्षरशः गहिवरून आले. 


या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, केंद्रप्रमुख रंजना उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.अजित सोनवणे सर, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विजय बेंढारी, अशोक दांगट, अंगणवाडी ताई आशा दांगट, शैला सुपे, मीरा बेंढारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन बाळासाहेब इंदोरे व आभार नामदेव कांबळे यांनी मानले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.