Skip to main content

रांजणी येथे विवाहितेच्या छेडछाड प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

निरगुडसर प्रतिनिधी



आंबेगाव तालुक्यात रांजनी कारफाटा येथे कॉलेज ला जाण्यासाठी बस ची वाट पाहत असलेल्या विवाहित तरुण महिलेचा तिथल्याच गावातील राहुल भोर याने बस स्टॉपवर येत चल तुला कॉलेज ला सोडतो,व तू मला आवडते असे म्हणत व वारंवार तिला फोन करून त्रास देत या महिलेची छेडछाड केली असल्याची घडला काही महिन्यापूर्वी घडली होती मात्र आरोपी नात्यातील असल्याने कौटुंबिक वाद होऊ नहे म्हणून याबाबत महिलेने कुणालाही सांगितले न्हवते मात्र आरोपी वारंवार त्रास देत असल्याने महिलेने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी राहुल भोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा या महिलेच्या नात्यातील असून तो अनेक दिवसांपासून या महिलेला वारंवार फोन करून जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता.फिर्यादी महिला ही कॉलेज मध्ये शिक्षण घेत असून ती काही दिवसापूर्वी कॉलेजला जाण्यासाठी रांजनी कारफाटा येथे बस स्टॉप वर उभी राहिली असता राहुल उदय भोर हा आपली गाडी तिथे घेऊन आला व चल तुला कॉलेजला सोडतो असे म्हणाला व पाठलाग करून त्रास देऊ लागला आरोपी हा नात्यातील असल्याने कौटुंबिक वाद होईल म्हणून या महिलेने या गोष्टीबद्दल कुणालाही सांगितले नाही मात्र आरोपी तिला फोनवर वारंवार त्रास देऊ लागला ,तिचा मानसिक त्रास पाहून तिच्या पतीने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला व तिचा पती व महिलेने मंचर पोलीस ठाण्यात दि,२१/२/२०२० रोजी फिर्याद दिली.या प्रकरणी राहुल भोर(वय २५) राहणार रांजनी ता ,आंबेगाव,पुणे याच्याविरोधात मंचर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३५४ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अलंकेश्वर भोसले करीत आहेत.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.