Skip to main content

जवळे येथे दोघांच्या आत्महत्या



जवळे (ता.आंबेगाव )येथील लायगुडे मळा येथे एकाच रात्रीत एका तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तुषार सोपान लायगुडे (वय २५) व निशा सावकार लायगुडे (वय ४५ ) दोघेही राहणार जवळे  लायगुडेमळा ता,आंबेगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे व महिलेचे नाव आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.



याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुषार लायगुडे यांनी बुधवार दि २६ रोजी पहाटे दिडच्या सुमारास मळ्यातील चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.रात्री दोन वाजता लोकांची गर्दी झाली असता या घटनेबाबत त्याच्या कुटूंबियांना कळाले गावचे पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी याबाबत मंचर पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तुषार ला खाली घेऊन रुग्णवाहिकेद्वारे त्याला मंचर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तो तपासण्या पूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले या बाबत दिलीप बबन लायगुडे  यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

तर याच मळ्यातील निशा सावकार लायगुडे (वय ४५)या महिलेने बुधवारी पहाटे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.सकाळी त्यांच्या घराशेजारील नंदा संतोष लायगुडे या जनावरांसाठी चारा आनण्यासाठी शेतात जात असताना त्यांना विहिरीत काहीतरी तरंगत असल्याचे दिसले त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पाण्यात विहिरीत कोणीतरी महिला बुडून तरंगत असल्याचे दिसले त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. याबाबत पोलीस पाटील यांनी मंचर पोलिसांचा कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वर काढत मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी महिलेला तपासून ती मयत झाली असल्याचे सांगितले याबाबत नंदा संतोष लायगुडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंकलेश्वर भोसले  पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.