Skip to main content

पुणे आणि नगर जिल्ह्यात गंभीर गुन्हे असणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

आंबेगाव तालुक्यातील महाळूगे पडवळ,येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या व चांडोली बुद्रुक येथे दुकानाचे शटर उचकटून पैसे चोरणाऱ्या तसेच मंचर, राहुरी, नगर ,ओतूर,येथील पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे.



तुकाराम बन्सी वारे (वय वर्षे १९ राहणार पळशी ता.पारनेर जि.अहमदनगर)व उत्तम दादाभाऊ दुधवडे (वय २५ राहणार वाळूचादरा ता.राहुरी जि.अहमदनगर) या दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी आंबेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी केलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस करत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे दिनांक २७/५/२०१९ रोजी बंद घर फोडून सुमारे २ लाख १८ हजार रुपयाची सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम,कागदपत्रे चोरी केली होती , तसेच चांडोली बुद्रुक येथे दिनांक १२/६/२०१९ रोजी गावातील गोरोबा जनरल स्टोअर या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून ९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली होती. तर यातील एक आरोपीने राहुरी येथे एका केसच्या तपासादरम्यान मंचर पोलिसांवर हल्ला करून पळून गेला होता तेव्हापासून या आरोपींचा शोध सुरू असताना शुक्रवार दिनांक २८/२/२०२० रोजी आळेफाटा येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुकाराम बन्सी वारे व उत्तम दादाभाऊ दुधवडे या दोन आरोपींना सापळा रचून पकडले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार एस.ए.जावळे, पो.ह.शरद बांबळे ,पो.ह.एस.व्ही.जम,पोलीस नाईक डी.डी. साबळे, पोलीस शिपाई अक्षय नवले, यांच्या पथकाने केली आहे.

या आरोपींवर पुणे ,अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडण्याची शक्यता आहे या विविध गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता या आरोपींच्या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.