Skip to main content

मंचर येथे १२ एकर उसाला शॉर्टसर्किट मुळे आग

 


मंचर येथील लोंढे मळ्यातीळ उसाला आग लागण्याची ही तिसरी वेळ. ग्रामस्थांची वीज वितारण कंपणीविरोधात तीव्र नाराजी.



आंबेगाव तालुक्यातील मंचर-लोंढेमळा येथे महावितरण कंपनीच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल १२ एकर क्षेत्रातील ऊस जळुन खाक झाला असून संबधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान  झाल्याचा अंदाज आहे. ऊस जळाल्याची घटना सोमवार दि.२४ रोजी दुपारी घडली. यापूर्वीही दोन वेळा याच क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळल्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांनी शेतातील विजेचे खांब हटविण्याची मागणी केली आहे. दरम्यान भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जळालेला ऊस गाळपासाठी तातडीने नेला जाईल.अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.


दरम्यान शॉर्टसर्किट मुळे उसाला आग लागणे हे नेहेमीचेच झाले आहे आणि या प्रकाराला सर्वस्वी महावितरणच जबाबदार आहे. अनेक वेळा तक्रार करूनही महावितरण या प्रकारविषयी गंभीर नसल्याने तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री ना. दिलीपराव वळसे यांनी या प्रकारात लक्ष घालावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे. के. थोरात यांनी केली आहे.



लोंढेमळा येथील शेतकरी  किसन माशेरे ३० गुंठे,अरुण लोंढे एक एकर,विकास खानदेशे दिड एकर,जालिंदर लोंढे दिड एकर,कमलेश लोंढे ३० गुंठे,राधा माशेरे १० गुंठे,मालुबाई लोंढे दिड एकर,लक्ष्मीबाई लोंढे अर्धा एकर,यमुनाबाई लोंढे ५० गुंठे,चंद्रकांत खानदेशे ३० गुंठे, निवृत्ती खानदेशे एक एकर, दत्तात्रय माशेरे एक एकर, अनिल लोंढे एक एकर असे एकुण १२ एकर २५ गुंठे क्षेत्रातील ऊस जळाला आहे.घटनास्थळी  भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब थोरात, सिताराम लोंढे, सामाजिक कार्यकर्ते जे.के.थोरात, माजी सरपंच अश्विनी शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष विकास खानदेशे, रामराव खानदेशे, भीमाशंकर कारखान्याचे कर्मचारी जे.बी.भोर, व्ही.व्ही.पालेकर, एस.व्ही.गुंजाळ, एन.जी.वायाळ यांनी भेट देवुन पाहणी केली.


 



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.