Skip to main content

पॅनल टू पॅनल मतदान करा - अजित पवार

माळेगाव कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी निळकंठेश्वर पॅनल विजयी करा मी तुमचे भाग्य उजळून टाकतो अशी हाक देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना पॅनल टू फायनल मतदान करण्याचे आवाहन केले माळेगाव येथे राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते अजित पवार म्हणाले निरा डावा कालव्याचे पाणी आपल्या सरकार मुळे समन्यायी पद्धतीने पुन्हा बारामती इंदापूर साठी वळविण्यात यश आले हे सरकार शेतकऱ्यांची असल्यामुळे हा फार मोठा निर्णय झाला भाजपची सत्ताधारी मंडळी त्यांचे सरकार असताना वरील प्रश्नांवर तोंड दुखत नव्हते या कारखान्यातील रिकवरी लॉस मुळे झालेले प्रतिटन तीनशे रुपयांचे नुकसान लोकप्रतिनिधी या नात्याने मला सहन होत नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पवार साहेबांनी आयुष्यभर काम केले प्रामुख्याने साखर उद्योग व दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते माळेगावच्या शेतकऱ्यांनाही अधिकचे दोन पैसे मिळवण्यासाठी त्यावेळी साखर निर्मितीबरोबरच डिस्टिलरी वीज निर्मिती सह आधी प्रकल्प उभारण्यासाठी साहेबांनी सहकार्य केले परंतु चंद्रराव अण्णा रंजन तावरे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे या कारखान्याचे वाटोळे झाले शेतकरी अडचणीत सापडला सोमेश्वर कारखाना जिल्हा बँक बारामती उत्सव मार्केट कमिटी आदी अग्रगण्य सहकारी संस्था राष्ट्रवादीचे पदाधिकारी उत्तम पद्धतीने चालवतात तुम्ही मात्र सहकाराच्या नावाखाली हुकूमशाही पद्धतीने सहकारी तत्वे अक्षरशहा पायदळी तुडवून कारभार केला विस्तारीकरणाचा प्रकल्प अहवाल घडवला शेतकऱ्यांच्या पोरांना सभासद करून घेतले नाही नोकरभरतीमध्ये ही त्यांच्यावर अन्याय केला शिक्षण संस्थेच्या कारभारात सहकारी लोकांना डावल नाही भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवला असता आपल्या सहकारी संचालकांना घरी घालविले असा घाणेरड्या कारभार करत सहकार मातीत घालण्याचे काम या मंडळींनी केले पवार म्हणाले रिकवरी वीज निर्मितीचा उच्चांक केलेल्या सोमेश्वर शी सहकारी तर सोडाच पण खाजगी कारखाने सुद्धा स्पर्धा करू शकत नाहीत अशीच स्थिती माळेगावची करून दाखवण्याची धमक निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांमध्ये आहे बाळासाहेब ठाकरे यांनी माळेगावचा पाच वर्षातील कारभार चुकीचा झाल्याचे सांगितले यावेळी सोमेश्वर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.


 


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.