Skip to main content

पॅनल टू पॅनल मतदान करा - अजित पवार

माळेगाव कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी निळकंठेश्वर पॅनल विजयी करा मी तुमचे भाग्य उजळून टाकतो अशी हाक देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना पॅनल टू फायनल मतदान करण्याचे आवाहन केले माळेगाव येथे राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते अजित पवार म्हणाले निरा डावा कालव्याचे पाणी आपल्या सरकार मुळे समन्यायी पद्धतीने पुन्हा बारामती इंदापूर साठी वळविण्यात यश आले हे सरकार शेतकऱ्यांची असल्यामुळे हा फार मोठा निर्णय झाला भाजपची सत्ताधारी मंडळी त्यांचे सरकार असताना वरील प्रश्नांवर तोंड दुखत नव्हते या कारखान्यातील रिकवरी लॉस मुळे झालेले प्रतिटन तीनशे रुपयांचे नुकसान लोकप्रतिनिधी या नात्याने मला सहन होत नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पवार साहेबांनी आयुष्यभर काम केले प्रामुख्याने साखर उद्योग व दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते माळेगावच्या शेतकऱ्यांनाही अधिकचे दोन पैसे मिळवण्यासाठी त्यावेळी साखर निर्मितीबरोबरच डिस्टिलरी वीज निर्मिती सह आधी प्रकल्प उभारण्यासाठी साहेबांनी सहकार्य केले परंतु चंद्रराव अण्णा रंजन तावरे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे या कारखान्याचे वाटोळे झाले शेतकरी अडचणीत सापडला सोमेश्वर कारखाना जिल्हा बँक बारामती उत्सव मार्केट कमिटी आदी अग्रगण्य सहकारी संस्था राष्ट्रवादीचे पदाधिकारी उत्तम पद्धतीने चालवतात तुम्ही मात्र सहकाराच्या नावाखाली हुकूमशाही पद्धतीने सहकारी तत्वे अक्षरशहा पायदळी तुडवून कारभार केला विस्तारीकरणाचा प्रकल्प अहवाल घडवला शेतकऱ्यांच्या पोरांना सभासद करून घेतले नाही नोकरभरतीमध्ये ही त्यांच्यावर अन्याय केला शिक्षण संस्थेच्या कारभारात सहकारी लोकांना डावल नाही भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवला असता आपल्या सहकारी संचालकांना घरी घालविले असा घाणेरड्या कारभार करत सहकार मातीत घालण्याचे काम या मंडळींनी केले पवार म्हणाले रिकवरी वीज निर्मितीचा उच्चांक केलेल्या सोमेश्वर शी सहकारी तर सोडाच पण खाजगी कारखाने सुद्धा स्पर्धा करू शकत नाहीत अशीच स्थिती माळेगावची करून दाखवण्याची धमक निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांमध्ये आहे बाळासाहेब ठाकरे यांनी माळेगावचा पाच वर्षातील कारभार चुकीचा झाल्याचे सांगितले यावेळी सोमेश्वर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.


 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.