Skip to main content

शिवसेना उपनेते आढळराव यांच्या हस्ते भैरवनाथ पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशक

प्रमोद दांगट : प्रतिनिधी 



भैरवनाथ पतसंस्थेनेे ३१ व्या वर्षात प्रदार्पण करत २३१ कोटींचा टप्पा पार केला आहे. संस्थेने आतापर्यंत शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक व सभासद यांना २०० कोटीचे कर्ज वाटप कलेले आहे. शंभर ते सव्याशे सभासच्या संख्येवर चालू केलेली पतसंसंस्थेचे जाळे मुंबई, पुणे, ठाणे, भोसरी, आळंदी या भागात पसरले आहे. आंबेगाव तालुक्यासह सर्वत्र पंधरा शाखांचा विस्तार झाला असून; भविष्यात अजूनही नवीन शाखा सुरु करण्याचा संकल्प आहे. जुन्नर, खेड, चाकण या ठिकाणीही लवकरात लवकर शाखा सुरु करणार आहोत. शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक यांच्या अडी अडचणींमध्ये पतसंस्थेने गेल्या ३० वर्षांपासून मदत करण्याचे काम केले आहे. पतसंस्थेचे सर्व कर्मचारी एकदिलाने काम करत आहेत. जुन्नर, खेड, आंबेगाव व इतर भागातील नागरिकांना पतसंस्था नियमित कर्जपुरवठा करत आहे. भविष्यात ५०० कोटी रुपयेच्या ठेवीचे लक्ष लवकारात लवकर पार करण्याचे उद्धिष्ट आहे. असे मत भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी भैरवनाथ पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना व्यक्त केले.

लांडेवाडी ( ता. आंबेगाव ) खासदार शिवाजी आढळराव पाटील संस्थापक असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेचा २०२० या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन लांडेवाडी येथे आढळराव पाटलांच्या निवासस्थानी संपन्न झाले. यावेळी संस्थेचे संचालक कल्पना आढळराव, सागर काजळे, योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे, राम तोडकर, अशोक बाजारे, हनुमंत तागड, मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव, शाखाधिकारी रमेश खळमाळे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, अतुल गुंजाळ, विलास राजगुरव, सुजाता काळे, सचिन बांगर, प्रवीण थोरात, सुनील बाणखेले, युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, शिवाजी राजगुरू आदि मान्यवर उपस्थित होते.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.