Skip to main content

बाळासाहेब थोरात करणार होते भाजपात प्रवेश - राधाकृष्ण विखे









































 















































बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, कुणाकुणाला भेटले याची सर्व माहिती, विखेंचा दावा.



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा खळबळजनक दावा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे 



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा खळबळजनक दावा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यावेळी विखेंनी बाळासाहेब थोरात यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी कुणाकुणाच्या भेटी घेतल्या त्याचीही माहिती माझ्याकडे असल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


राधाकृष्ण विखे म्हणाले, “अहमदनगरमध्ये १२ जिल्ह्यांपैकी यांना अवघ्या तीन जागा लढवता आल्या. त्यातच यांना कसंबसं यश मिळालं. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाची काळजी करु नये. कारण पूर्वी त्यांचाच भाजपमध्ये जाण्याचा विचार होता. दोन ते तीन वर्षांपूर्वी ते कोणत्या नेत्याला जाऊन भेटले होते हे आता मी सांगण्याची गरज नाही.”


बाळासाहेब थोरात यांना सर्व अपघाताने मिळालं आहे. यात त्यांचं कर्तुत्व काहीही नाही. साडेचार वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून मी जे काम केलं त्यामुळेच काँग्रेसला हे अच्छे दिन आले. मी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही भांडलो. त्यावेळी थोरात साडेचार वर्ष गायबच होते. ते न सभागृहात बोलत होते, ना सभागृहाच्या बाहेर बोलत होते. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा फुटबॉल झाला आहे, असा आरोपही विखेंनी थोरातांवर केला.


"स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस-शिवसेनाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं"


विखे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षाच्या भूमिका आणि पक्षाबद्दल काही सांगण्याचं कारण नाही. या विधानसभा निवडणुकीत लोकांनी हे अनुभवलं आहे. त्यांनी निवडणुकीत हेलिकॉप्टर भाड्याने आणलं, पण ते संगमनेरमध्येच मुक्कामी ठेवलं. कारण त्यांना स्वतःचा मतदारसंघ सोडून पक्षाच्या प्रचारासाठी बाहेर जाता आलं नाही.”









पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.