Skip to main content

अजित पवार हेच उपमुख्यमंत्री.








उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 30 तारखेला होणार आहे. तत्पुर्वी उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारंच पुन्हा शपथ घेतील असे सुतोवाच करण्यात येत आहे. यासाठी पुणे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शपथविधिपुर्वीच जंगी स्वागत समारंभ व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


 

या कार्यक्रमाचं रितसर पत्रकदेखील राष्ट्रवादीकडून काढण्यात आलं आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांना या कार्यक्रमाची कल्पना दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाण्यापूर्वी अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. याच दिवशी त्यांचे स्वीयसहाय्यक सुनील मुसळे यांच्या मुलाचे रिसेप्शन आहे. तिथं अजित पवार उपस्थित राहतील. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.

दरम्यान, फडणवीसांसोबत 80 तासांच सरकार स्थापन केल्यानंतर अजित पवार यांच पक्षातील वजन कमी झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांच उपमुख्यमंत्रिपद त्यांच्याकडून निसटल्याची चर्चा रंगली होती. तसेच, मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप न झाल्याने सस्पेन्स वाढला होता. त्यातच सिंचन घोटाळ्यात एसीबीने क्लीन चिट दिल्यामुळे त्यांची इमेज सुधारण्यास मदत झाली होती. अशातच आता पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यात येणार असल्याने अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री फिक्स मानले जात आहे.


तसेच, यापुर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हटले होते. त्य़ामुळे उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांनाच मिळणार यावर जवळपास महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.