Skip to main content

दिलीपराव वळसे पाटील कॅबिनेट मंत्रिपदी, आंबेगावात झाला गाजावाजा.

 


तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे त्यांच्या चाहत्यांनी आंबेगावात गाजावाजा करत, एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.  



आंबेगाव तालुक्याचे आमदार व विधानसभेचे माजी अध्यक्ष; दिलीपराव वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच आंबेगाव तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी ग्रामस्थांनी एकच जल्लोष करून फटाके फोडत एकमेकांना लाडू व पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी निरगुडसर गावच्या सरपंच उर्मिला वळसे पा, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव वळसे पा, शरद वळसे पा, माजी उपसरपंच रामदास वळसे पा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल हांडे देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद वळसे पाटिल, तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे देशमुख, प्रगतशील शेतकरी रामदास थोरात, उदय हांडे देशमुख, बाळासाहेब येवले, पांडूशेठ टाव्हरे, सुधीर गावडे, जयसिंग खिलारी, माऊली टाव्हरे, सुदाम वळसे, यासह राष्ट्रवादी कॉग्रेस चे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

वळसे पाटील यांच्याकडे एक संयमी व दूरदर्शी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. अतिशय शांत व सोज्वळ असलेल्या वळसे-पाटील यांनी आपल्या आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. सर्वसामान्यांची नाळ माहिती असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. त्याचप्रमाणे तालुक्यातील शरद सहकारी बँक मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला वळसे पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री वैद्यकीय उच्च व तंत्र-शिक्षणमंत्री विधानसभेचे माजी अध्यक्ष या पदांचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग तालुक्याच्या व राज्याच्या विकासाला होणार आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.