Skip to main content

एकलहरे येथे बालआनंद मेळाव्याचे आयोजन

 



 




जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा एकलहरे (ता.आंबेगाव) येथे थोर समाजसुधारक सानेगुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विजय सुरुकुले होते.

 


 

       मेळाव्याच्या प्रारंभी सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन शालेय विद्यार्थी व कथामाला कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.'खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे' या प्रार्थनेने मेळाव्याची सुरुवात झाली.यावेळी शिक्षकनेते मंगेश मेहेर,रविंद्र वाजगे,प्रमिला हिंगे,प्रतिभा पडवळ,कमल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.शेवाळवाडी(मंचर),शिंदेवाडी व एकलहरे शाळेतील विद्यार्थ्यांचे गीतगायन,कथाकथन,कृतीयुक्तगीत सादरीकरण व मजेशीर खेळ घेण्यात आले.

 

  यावेळी विजय सुरुकुले म्हणाले ,'करी मनोरंजन जो मुलांचे,जडेल नाते प्रभुशी तयाचे या उक्तीप्रमाणे मनोरंजातून मुलांवर संस्कार करणारे सानेगुरुजी खरे देशभक्त होते.स्वच्छता त्यांना प्रिय होती.खोटे बोलणे त्यांना कधी जमले नाही.जे बोलायचे ते मनापासून आणि करायचे ते उत्तम कृतीतून.सानेगुरुजी यांचे विचार व चरित्र वाचनानेच समजेल.मुलांनी वाचावे व आईवडील,शिक्षक आणि राष्ट्राशी  प्रामाणिक राहावे.

 

   प्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांचे जादूचे प्रयोग बालआनंद मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले.यावेळी रुमालापासून बल्ब व चेंडू बनवणे,पाण्याची जादू,पेपर फाडणे व जोडणे,दोरीची काठी बनवणे व संमोहनाने मुलांना नाचविणे आदी जादूच्या प्रयोगामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.

 

        याप्रसंगी 'श्यामची आई' संस्कार परीक्षेसाठी विद्यार्थी बसविणाऱ्या नगदवाडी,पाबळवाडी(ता.जुन्नर),निगडाळे,शेवाळवाडी, शिंदेवाडी,एकलहरे(ता.आंबेगाव) येथील शिक्षकांना कथामाला पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणगाव क्र १ व २,नारायणवाडी(ता.जुन्नर),चंदनवाडी व दारुंब्रे(ता.मावळ) या शाळांनी आजीव सभासदत्व स्विकारले.यावेळी प्रमिला हिंगे,विद्या वाघ,प्रतिभा पडवळ यांनी कथामालेसाठी दहा हजारांची देणगी दिली.

 

    कार्यक्रमाची व्यवस्था संतोष थोरात,प्रदीप चासकर,अभिजित नाटे,अजिजा इनामदार यांनी पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामाला राज्य प्रतिनिधी मुख्याध्यापिका मनिषा कानडे यांनी तर आभार कथामाला जिल्हा कार्यवाह चांगदेव पडवळ यांनी मानले.

 

 




 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.